नगर – शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून करोना रुग्ण संख्येने उच्चांक गाठला होता. सलग आठ दिवस रुग्ण संख्या साडेतीन हजारांच्या पुढे होती. मात्र, दोन दिवसांपासून रुग्ण संख्येचा आलेख उतरता आहे. गेल्या चोवीस तासांत दोन हजार 655 जणांना करोनाची बाधा झाली असून, कालच्या पेक्षा आज दोनशेने रुग्ण संख्या घटली आहे.
असं असले तरी काही दिवसांपूर्वी रेमडेसिविर इंजेक्शनचा नगरमध्ये काळाबाजार होत असल्याच्या चर्चा होत्या. भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी विशेष विमानाने चा साठा नगर जिल्ह्यात आणला होता. या साठ्याचे वाटप झाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ चित्रफितीद्वारे ही माहिती दिली. फेसबुकवर शेअर केलेल्या या व्हिडियोवरून सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. ठाकरे सरकारमधील नेते या व्हिडियोवर प्रश्न उपस्थित करीत आहे.
लोकप्रतिनिधी असले तरीही रेमडेसिवीरचा साठा करणे अयोग्य आहे, असा शाब्दिक टोला उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांनी खा. सुजय विखे यांना लगावला. कोणीही असले तरी सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करून ते जनतेच्या हिताचे आहे का, हे तपासून पुढील निर्णय घ्यावे, असेही अजितदादा म्हणाले. pic.twitter.com/6LotdWsK07
— NCP (@NCPspeaks) April 27, 2021
यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सुजय विखेंलांवर टीका केली आहे. अजित पावर म्हणाले,विमानातील व्हिडिओचा आणि फोटोंचा कोणी अतिरेक करु नये, पण लोकप्रतिनिधींनी सगळ्या गोष्टींची शहानिशा करुनच आपलं काम केलं पाहिजे, उदाहरण सुजय विखेंचं असले तरी सर्वच पक्षातील लोकप्रतिनीधींनी या महामारीच्या संकटात सामंजस्य भूमिका घ्यायला हवी. असंही ते म्हणाले आहे.
दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी परदेशातून आणलेली औषधे किंवा इंजेक्शने सरकारकडे जमा करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.