मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. मात्र, अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. अर्थसंकल्पाच्या नावाखाली अजित पवार यांनी जाहीर सभेतील भाषण केले असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.
अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कुठलीही आकडेवारी नव्हती केवळ भाषण होते, आर्थिक स्थितीचे विश्लेषण नव्हते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ओपनिग, क्लोजिग बॅलेन्स किती असेल? किती तूट राहील? यातील कुठलीही गोष्ट अर्थसंकल्पामध्ये नव्हती. या अर्थसंकल्पामुळे तूट वाढणार आहे. अर्थसंकल्पामध्ये कुठलेही संतुलन नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.