Ajit Pawar Plane Crash : बुधवारचा दिवस हा राज्यात एक काळा दिवस ठरला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला . या हृदयद्रावक घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने राज्यचं नाही तर अख्खा देश हळहळला आहे. दरम्यान, या विमानात अजित पवार यांच्यासह ६ जण प्रसव करत होते. तर या सारथ्य अनुभवी वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांच्याकडे होते. तर पिंकी माली या फ्लाइट अटेंडंट म्हणून कार्यरत होत्या. अपघातग्रस्त विमान ‘VSR व्हेंचर्स’ कंपनीचे ‘लिअरजेट ४५’ (Learjet 45) असून त्याचा नोंदणी क्रमांक VT-SSK असा आहे. Ajit Pawar Plane Crash : फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक या २०२२ पासून ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ (VSR Ventures) कंपनीत कार्यरत होत्या. सुमारे ९,७५२ किलो वजनाचे हे विमान चालवणाऱ्या शांभवी पाठक या २०२२ पासून या कंपनीशी जोडल्या गेल्या होत्या. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१८ ते २०१९ या काळात न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक पायलट अकादमीतून विशेष प्रशिक्षणही घेतले होते. त्यांच्याकडे एवढा दांडगा अनुभव असूनही हा विमान अपघात कसा झाला हा प्रश्न उपस्थित होत आहे. Ajit Pawar Plane Crash : अजित पवार प्रवास करत असणारे हे विमान जमिनीवर आदळताच चक्काचूर झाले आणि विमानाने क्षणात भीषण पेट घेतला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, कॅप्टन सुमित, शांभवी पाठक आणि पिंकी माली या पाचही जणांचा होरपळून मृत्यू झाला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या पाचही जणांच्या मृत्यूची पुष्टी केली असून विमानाचे अवशेष पूर्णपणे जळून राख झाले आहेत. डीजीसीएने या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्या कंपनीचे हे विमान होते, ती ‘VSR व्हेंचर्स’ ही दिल्लीस्थित खाजगी एव्हिएशन कंपनी असून तिची स्थापना २०११ मध्ये झाली होती. कॅप्टन विजय सिंग आणि कॅप्टन रोहित सिंग हे या कंपनीचे मालक असून, विशेष म्हणजे १४ सप्टेंबर २०२३ रोजी याच कंपनीच्या एका विमानाला मुंबई विमानतळावरही अपघात झाला होता. Ajit Pawar Plane Crash : हा भीषण अपघात सकाळी ८:४५ ते ९:१५ च्या सुमारास घडला. अजित पवार मुंबईहून बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि जनसभांना संबोधित करण्यासाठी निघाले होते. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंगचा प्रयत्न करत असताना विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे विमान धावपट्टीवर न उतरता जवळच्याच एका शेतात कोसळले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, कॅप्टन सुमित, शांभवी पाठक आणि पिंकी माली या पाचही जणांचा होरपळून मृत्यू झाला.