नवी दिल्ली: महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले असताना शनिवारी सकाळी मोदी घडामोड घाडली आहे. शनिवारी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली. आणि यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. अजित पवार याना तुरुंगाची भीती दाखवूनच फोडले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
सुरजेवाला म्हणले की, २३ नोव्हेंबर हा दिवस देशाच्या इतिहासात काळा दिवास म्हणून नोंदवला जाईल. तसेच मुख्यमंत्री हे अजित पवारांना तुरुंगात पाठवणार होते, परंतु त्यांनी उपमुख्यमंत्री करून पाठवले आहे. भाजपने अजित पवारांना तुरुंगाची भीती दाखवून फोडत लोकशाहीची हत्या केली आहे. तसेच हा महाराष्ट्राच्या जनतेचा मोठा विश्वसघात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच यावेळी बोलताना सुरजेवाला यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. कोश्यारी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा दूत म्हणून काम केलं आहे. यावेळी बोलताना सुरजेवाला यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते पुढील प्रमाणे
- भाजपने सरकार स्थापनेचा दावा कधी केला?
- भाजपने किती आमदारांवर सह्या सादर केल्या?
- राज्यपालांनी आमदारांच्या स्वाक्षरीची पडताळणी कधी केली?
- राष्ट्रपती राजवट कधी काढून टाकली आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक कधी झाली?
- केंद्रीय मंत्रिमंडळाची शिफारस राष्ट्रपतींना कधी पाठविण्यात आली?
- शपथविधीत महाराष्ट्रातील सरन्यायाधीशांना का बोलावले नाही?
- भाजपने सरकार स्थापनेचा दावा कधी आणि कुणी सादर केला?
- बहुमत सिद्ध करण्यासाठी किती वेळदेण्यात आला ?
- कोणत्या वेळी केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस केली? हे राष्ट्रपतींकडे केव्हा पाठविण्यात आले? शपथविधी सोहळा किती वाजता झाला?
- खासगी वृत्तसंस्थेखेरीज इतर अधिकारी, नेता का बोलावले नाहीत?