मुंबई – सरकार स्थापनेच्या पेचावरून राज्यात उडालेल्या राजकीय धुराळ्यात नेते अडकले आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकलानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान यांनी प्रतिक्रिया दिला आहे.
So #AjitPawar and #DevendraFadnavis ji have already resigned and now it’s confirm that next govt will be formed by #ShivaSena #NCP and #Congress and #UdhavThackeray ji will be next CM of #Maharashtra! And this is what i predicted long ago.
— KRK (@kamaalrkhan) November 26, 2019
दरम्यान, अभिनेता कमाल आर खान यांनी ट्विटरवर ट्विट करत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या केआरकेच ट्वीट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,‘,आज अजित पवार धोब्याचा पप्पू ठरले. ना घरातले राहिला ना घाटवरचे. याशिवाय त्यानं आणखी एक ट्विट केलं ज्यात त्यानं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. केआरकेची ही दोन्ही ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.