नवी दिल्ली – कोरोनावर मात करता येईल पण त्यासाठी संपूर्ण देशाने एकत्र येत आलेल्या परिस्थितीचा सामना करणे महत्त्वाचे आहे, त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. सरकारच्या या प्रयत्नांना आपण सहकार्य केले पाहिजे, अशा शब्दात भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने देशवासियांना आवाहन केले आहे.
As responsible citizens of the country, we need to do our part in our fight against Covid-19. Let’s follow the norms set up by our honourable Prime Minister Shri @narendramodi ji to ensure our own safety.
Stay safe everyone!#IndiaFightsCorona— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) March 19, 2020
तसेच कोरोनाशी लढा देण्यासाठी आपण सरकारी यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी आपण आपल्या वागणुकीत काही बदल करणे गरजेचे आहे. गरज नसेल तर विनाकारण घराबाहेर पडू नका, सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केले व काळजी घेतली तर आपण करोनाचा यशस्वी मुकाबला करू शकतो, असे देखील अंजिक्य रहाणे याने म्हटले आहे.
कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी आपण आपल्या वागणुकीत काही बदल करणे गरजेचे आहे. याचबरोबर आपले शासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करूया. @mybmc @CMOMaharashtra#CoronavirusOutbreakIndia pic.twitter.com/KIJmBE3sbr
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) March 19, 2020
दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 64 झाली आहे, तर देशात 200 हून अधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत. तसेच राज्यसरकारबरोबरच सेलिब्रिटी, खेळाडू हे देखील सोशल मीडियाव्दारे कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करीत आहेत.