लडाख – चिनी लष्करासोबत निर्माण झालेल्या तणावाला हिंसक वळण लागले असून संघर्षात भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि 20 जवान शहीद झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. याच मुद्यावरून सध्या देशात भारतीयांकडून आक्रमक प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली जात आहे. तर गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याची महती सांगण्याऱ्या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण करणार असल्याचे सांगितले.
IT’S OFFICIAL… #AjayDevgn to make film on #GalwanValley clash… The film – not titled yet – will narrate the story of sacrifice of 20 #Indian army men, who fought the #Chinese army… Cast not finalized… Ajay Devgn FFilms and Select Media Holdings LLP will produce the film. pic.twitter.com/yaM6rPcK7Z
— taran adarsh (@taran_adarsh) July 4, 2020
या पार्श्वभूमीवर अजय देवगण याने या घटनेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे सांगितले. फिल्म अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी याबाबत ट्विट केले आहे.
तरण आदर्श यांनी याबाबत ट्विट केले आहे की,’या चित्रपटाचे नाव काय असेल किंवा चित्रपटात कोणते कलाकार असतील, हे अद्याप निश्चित झालेले नाही. तसेच अजय देवगण स्वत: चित्रपटात काम करणार आहे का, याविषयीही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. केवळ अजय देवगण फिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग एएलपी यांच्याकडून चित्रपटाची निर्मिती होणार असल्याचे निश्चित झाले आहे.’