मुंबई – एअरटेल कंपनीने आपल्या मोबाईलच्या दरामध्ये 20 ते 25 टक्क्यांची वाढ जाहीर केली. त्यानंतर या कंपनीच्या शेअरच्या भावात 4 टक्क्यापर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले.
कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार प्रीपेड ग्राहकासाठी कंपनीने आपल्या दरामध्ये 20 ते 25 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे कंपनीचा महसूल आणि नफा वाढण्याची शक्यता असल्यामुळे आगामी काळातही या कंपनीचा शेअर तेजीत राहू शकतो. दरडोई महसून किमान 200 रुपये असल्याची आवश्यकता असल्याचे कंपनीचे म्हणने आहे.
रिलायन्स पिछाडीवर
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सौदी आर्मको या कंपन्यातील 15 अब्ज डॉलरचा व्यवहार फिसकटला असल्यामुळे सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचा 4 टक्क्यापर्यंत शेअर घसरला. त्यामुळे कंपनीचे बाजारमुल्य 69,364 कोटी रुपयांनी कमी झाले. आगामी काही काळ तरी या कंपनीच्या शेअरच्या भावावर दबाव राहण्याची शक्यता विश्लेषकांना वाटते. रिलायन्स इंडस्ट्रीजमधील तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात आर्मको कंपनी 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार होती. मात्र ही चर्चा आता थांबविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.