नवी दिल्ली – देशामध्ये करोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस संसर्ग वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने आता 3 मे 2020 पर्यंत लॉकडाऊनची संपूर्ण देशात घोषणा केली आहे. या सर्व घरामोडींचा परिणाम आणि नुकसान अन्य उद्योगांप्रमाणे विमान प्रवासांवर आगामी काळात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने विमान प्रवासाची तिकीटे लक्षणीयरित्या महागण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनचा प्रभाव आगामी काळातही कायम ठेवण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विमानातून प्रवास करताना सामाजिक अंतर कायम राखण्याचा नियम ठेवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात तीन आसनांच्या ठिकाणी विमानात फक्त 60 प्रवाशांना प्रवास करता येणार असल्याचे विमान अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे. वरीलप्रमाणे आसन व्यवस्थेत बदल केल्यास येत्या काळात विमान प्रवासाचा खर्चात विमान कंपन्यांना 3 पट नुकसान सहन करावे लागणार आहे. तसेच विमानतळावरही बैठक व्यवस्थेत 50 टक्के कमीच प्रवाशाची बैठक व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
विमानतळांचे नियम बदलणार?
डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एविएशन (डीजीसीए) यांच्या एका तयार करण्यात आलेल्या आराखडयानुसार नियोजन प्लॅन निर्माण करण्यात आला आहे. यात विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून ते बोर्डिंग गेटपर्यंत राखावयाचे सामाजिक अंतर आधीचे नविन बदल काळात आगामी काळात करण्यात येणार असल्याचे अंदाज सध्या व्यक्त केले जात आहेत.
दरम्यान, विमान कंपन्या आणि विमानतळाचे ऑपरेटर्स यांच्यात एका ठराविक पातळीवर चर्चा घडवून आली आहे. यात प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, आणि अन्य मोठया विमानतळासंदर्भात लॉकडाऊनच्यानंतर हवाई मार्गांचा व प्रवाशांचा कोणते नविन नियमावली आखण्यात येणार आहे. यासंदर्भात ही चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.