नवी दिल्ली : प्रदुषणाची पातळी अतिचिंताजनक पातळीवर पोहोचल्याने दिल्लीत सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. राज्यभर सर्वत्र धूर आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे. पंजाब, हरयाणातले शेतकरी राब पेटवत असल्याने दिल्लीतील प्रदुषणात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही राज्यांमधील सरकारची चांगलीच कानउघाडणी केली. मात्र भाजप नेते विनीत अग्रवाल यांनी हवेच्या प्रदूषणासाठी पाकिस्तान आणि चीनला जबाबदार धरलं आहे.
दरम्यान, भाजपा नेते विनीत अग्रवाल यांनी म्हंटले की,’आपल्या देशाला घाबरणाऱ्या शेजारी देशानं विषारी वायू सोडला असावा. त्यामुळे हवा प्रदूषित झाली असावी. पाकिस्तान आणि चीन आपल्याला घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी विषारी वायू सोडला असावा, असेही भाजपा नेते विनीत अग्रवाल यांनी म्हटले. त्यांच्या या निराधार विधानाचा व्हिडीओ सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
#WATCH Meerut: BJP leader Vineet Agarwal Sharda speaks on pollution issue. Says “…Ye jo zehreeli hawa aa rahi hai, zehreeli gas aayi hai ho sakta hai kisi bagal ke mulk ne chhodi ho jo humse ghabraya hua hai. Mujhe lagta hai Pakistan ya China humse ghabraye huye hain…” (5.11) pic.twitter.com/Ajnw5d7jXU
— ANI UP (@ANINewsUP) November 5, 2019