नवी दिल्ली – भारताच्या पुरुष आणि महिला नेमबाजी संघाने आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत पुरुष आणि महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक गटात भारताने दोन सुवर्णपदके पटकावली. महिलांच्या सामन्यात यशस्विनीसिंह देवलची कामगिरी निर्णायक ठरली.
या संघात यशस्विनीसह मनू भाकर व श्री निवेथा यांचा समावेश होता. तर, पुरूष संघात सौरभ चौधरीसह अभिषेक वर्मा व शाहझर रिझवी सहभागी झाले होते. भारताच्या महिला संघाने ज्युलिटा बोरेक, जोआना इवोना वावरझोनोवस्का आणि अग्निझेस्का कोरेजवो यांचा 16-8 असा पराभव करत प्रथम क्रमांक मिळवला.
पुरुष संघाने डिन्ह थान्ह गुयेन, कोक कुआँग ट्रान आणि झुआन चुयेन फान भारताच्या ऐश्वर्य प्रतापसिंह तोमर, दीपक कुमार व पंकज कुमार यांनी भारताला पुरुषांच्या सांघिक एअर रायफल प्रकारात रजतपदक मिळवून दिले.
महिलांच्या सांघिक एअर रायफल प्रकारात भारताच्या निशा कनवार, श्रियांका शादांगी आणि अपूर्वी चंडेला यांना पदकाने हुलकावणी दिल्यामुळे चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भारताची युवा नेमबाज गनेमत सेखॉन हिने या स्पर्धेच्या इतिहासातील आपले पहिले वहिले पदक मिळवले. तिने महिलांच्या स्किट प्रकारात ब्रॉंझपदकाची कमाई केली.