नवी दिल्ली – एअर इंडियासाठी लावलेली बोली टाटा समूहाने जिंकल्याचे वृत्त सरकारने फेटाळून लावले आहे. या पुर्वी एएनआय आणि ब्लूमबर्ग या संस्थांनी टाटांनी ही बोली जिंकल्याचे वृत्त दिले होते.
एअर इंडिया निर्गुंतवणुकीची निविदेस भारत सरकारने मंजुरी दिल्याची माध्यमांत आलेले वृत्त माध्यमांत आलेले वृत्त चुकीचे आहे, असे ट्विट गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने केले आहे.
टाटा समूह आणि स्पाईस जेटचे अध्यक्ष अजय सिंह यांनी कर्जात बुडालेल्या ओर इंडियासाठी निविदा गेल्या महिन्याच्या सुरवातीला भरली होती. डिसेंबर 2020 मध्ये केंद्र सरकारने एअर इंडियामध्ये निर्गुंतवणुक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यात सहभागी होण्याची इच्छा चार कंपन्यांनी व्यक्त केली होती. टाटा समूह आणि अजयसिंह यांनी अंतिम टप्प्यापर्यंत या बोलीत कायम होते.
याबाबत अजयसिंह यांनी एक प्रस्ताव सादर केला होता. त्यापुर्वी सनदी अधिकाऱ्याणी बोली लावण्याचा प्रस्ताव दिला होता. तो सरकारकडून स्वीकारण्यात आला होता, असे या प्रक्रियेशी संबंधित असणाऱ्या सूत्रांनी नाव नछापण्याच्या अटीवर सांगितले.
टाटा समूहाने 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती. त्यानंतर भारत सरकारने 1953 ला आपल्या ताब्यात घेतली होती. एअर इंडिया विकण्याची प्रक्रिया जानेवारी 2020 पासून सुरु झाली होती. मात्र करोना संकटामुळे यात विलंब झाला. एप्रिल 2021 मध्ये सरकारने पुन्हा एकदा कंपन्यांना बोली लावण्याचा प्रस्ताव दिला. 2020 या वर्षात देखील टाटा ग्रुपने एअर इंडिया खरेदीसाठी प्रस्ताव दिला होता.
यापूर्वी 2017 मध्ये सरकारने एअर इंडियाचा लिलाव सुरु केला होता. मात्र तेव्हा कोणत्याही कंपनी स्वारस्य दाखवले नव्हते. सध्या एअर इंडियावर 60,074 कोटी रुपयांचे कर्ज आहे. मात्र खरेदी करणाऱ्या कंपनीला 23,286.5 कोटी द्यावे लागणार आहेत.