नवी दिल्ली – सार्वनीक क्षेत्रातील इंडिया कंपनीची विक्री डिसेंबर पूर्वीच करण्याबाबत सरकार हालचाली करीत आहे. यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत बोली बोलण्याची मुभा देण्यात आली आहे. काही कंपन्यांनी मुदतवाढ मागितली होती मात्र सरकारने मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे.
करोना आणि तत्सम कारणामुळे या अगोदर सरकारने पाच वेळा बोली बोलण्यास मुदत वाढ दिली होती. प्रार्थमिक बोलीत टाटा समूहासह अनेक कंपन्यांनी भाग घेतला आहे. त्यातील पात्र कंपन्यांना एअर इंडियाचा ताळेबंद पाहण्याची मुभा देण्यात आली आहे.
वित्तीय बोली आल्यानंतर कंपनीची किमान किंमत सरकार ठरवेल. कंपनीतील 100 टक्के भाग भांडवल सरकार विकणार आहे. डिसेंबरपुर्वी विक्री प्रक्रिया पूर्ण करण्याचा मनोदय असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. या कंपनीवर तब्बल 60,074 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यातील किती कर्जाचा भार उचलण्याची तयारी आहे, हे बोलीधारकांना विचारण्यात आले आहे.
गेल्या 13 वर्षापासून ही कंपनी तोट्यात चालत आहे. सरकारने जास्तीत जास्त कंपन्यातून निर्गुंतवणूक करण्याचे धारण अर्थसंकल्पात जाहीर केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून एअर इंडिया कंपनी विकण्यात येणार आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कंपनी विकण्यास विरोध केला आहे.