मुंबई – एअर इंडियाचे मे अखेरपर्यंत खाजगीकरण होणे जवळपास निश्चित झालेले आहे. नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज ही माहिती दिली. एअर इंडियाचा 100 टक्के हिस्सा विकला जाईल, असेही पुरी म्हणाले आहेत.
एअर इंडिया इतकी डबघाईला गेली आहे, की एकतर ती बंद करणे किंवा विकणे या व्यतिरिक्त केंद्र सरकारकडे कोणतेही पर्याय उरलेले नाहीत. त्यामुळे त्याची 100 टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय निश्चितझाला आहे. एअर इंडियावर सध्या 60 हजार कोटींचे कर्ज आहे आणि हाच कर्जाचा बोजा कंपनीचे खाजगीकरण केल्याशिवाय कमी होणार नाही, असे मत सरकारचे आहे.
एअर इंडिया कुणाला विकायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र याची बोली लावण्यासाठी कंपन्यांना 64 दिवसांचा कालावधी दिल्याचे पुरी म्हणाले. त्यामुळे मे अखेर किंवा जूनच्या सुरुवातीपर्यंत एअर इंडियाचे खाजगीकरण झालेले असेल, हे निश्चित होते आहे.