नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशाच्या विविध भागातून हवाई दलाने 625 टन नव्या नोटांची वाहतूक केली होती, अशी माहिती हवाई दल प्रमुख (निवृत्त) बी. एस. धनोरीया यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर 2016 रोजी घेतला होता. मुंबई आयआयटीत शनिवारी आयोजित व्याख्यानात धनोरीया म्हणाले, जेंव्हा नोटाबंदी झाली, आम्ही (हवाई दल) चलन घेतले आणि तुमच्या पर्यंत पोहोचवले. जर 20 किलोच्या एका बॅगमध्ये एक कोटी रूपये बसत असतील तर मला माहित नाही की आम्ही किती कोटी रुपयांची वाहतूक केली.
धनोआ यांनी 625 टन चलनाची वाहतूक करणाऱ्या 33 मोहीमांचे एक छायचित्रही दाखवले. धनोआ हे 31 डिसेंबर 2016 ते 30 सप्टेंबर 2019 या काळात हवाई दल प्रमुख होते. राफेल विमानांबाबत ते म्हणाले, अशा वादांमुळे संरक्षण दलाच्या ताब्यात साधने मिळण्यास विलंब होतो. त्याचा परिणाम सशस्त्र दलांच्या क्षमतेवर होतो.
बोफोर्स तोफा उत्तम होत्या मात्र त्या वादामुळे त्यांचा ताबा िंमळण्यास उशीर झाला, असेही सांगून ते म्हणाले, गेल्या वर्षी बालाकोट हल्ल्याच्या वेळी जर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान मिगऐवजी राफेलमध्ये असते तर निश्चितपणे उत्तर वेगळे मिळाले असते.