नगर (प्रतिनिधी) –कोविड -19 साथ रोगामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या परिस्थितीत जीईई/नीट च्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलणे अपेक्षित आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेण्याचा घाट मोदी सरकार घालत आहे. मोदी सरकार मधील शिक्षण खाते विद्यार्थांच्या जीवाचा खेळ मांडू पाहत आहे. लाखो विद्यार्थी याविरोधात आवाज उठवत असून, विद्यार्थांच्या जीवाशी खेळण्याचा कुठलाही नैतिक अधिकार केंद्रातील मोदी सरकारला राहिलेला नाही असे, प्रतिपादन माजी महापौर दीप चव्हाण यांनी केले.
शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, मोदी सरकार करीत असलेले हे कृत्य कॉंग्रेस पक्ष कधीही खपवून घेणार नाही. विद्यार्थ्यांचा आड भाजप राजकारण करीत आहे. या परीक्षांना हजर राहण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. यामुळे पालक वर्ग देखील चिंतीत सापडला आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी चे प्रदेश अध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, व युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहर जिल्हा कॉंग्रेस च्यावतीने जेईई – नीट च्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आयकर भवन कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले.
यावेळी महिला कॉंग्रेसच्या नलिनी गायकवाड, रजनी ताठे, जरीना पठाण, शारदा वाघमारे, रिजवान शेख, डॉ. मनोज लोंढे, शिल्पा दुसुंगे, हेमलता घाटगे, अजित वाडेकर, एन.एस.यु.आय अध्यक्ष दानिश शेख, चंद्रकांत उजागरे, प्रवीण गीते, आदित्य बर्डे, राहुल पवार, शंकर आव्हाड, मुबीन शेख आदी उपस्थित होते.