मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे पडसाद पडण्यास सुरुवात झाली असून नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांवर टीका केली. यानंतर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनीही टीकास्त्र सोडले आहे.
अहमद पटेल म्हणाले कि, महाराष्ट्राच्या इतिहासात आजची घटना काळ्या शाईनं लिहिली जाईल, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. ते पुढे म्हणाले, राज्यपालांनी सर्वांना संधी दिली पाहिजे होती. परंतु काँग्रेसला संधी देण्यात आली नाही. त्यानंतर कोणत्याही पडताळणीशिवाय एक नेता जाऊन यादी देतो, त्याची पडताळणी होणं आवश्यक होतं. कोणालाही याची कल्पना नव्हती. ज्या प्रकारे हा शपथविधी पार पडला त्याप्रमाणे काहीतरी चुकीचं झालंय असं झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
सत्ता स्थापनेमध्ये काँग्रेसकडून उशिर झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्याने हा पेच निर्माण झाला. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र मिळून याचा सामना करू. संविधानाची अवहेलना करून हा शपथविधी पार पडला, असे स्पष्टीकरण अहमद पटेल यांनी दिले आहे.
Ahmed Patel, Congress: We will fight this on both fronts, political and legal. #Maharashtra https://t.co/77euYvgmTa pic.twitter.com/55mFDAPLh7
— ANI (@ANI) November 23, 2019