मुंबई – वाढती महागाई आणि इंधन दरवाढ यावरून कॉंग्रेस आक्रमक झाले असून महिला कॉंग्रेसच्यावतीने केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचा जाहीर निषेध कऱण्यात आला. स्मृती इराणी हॉटेलवर पोहचण्याआधीच त्यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी आणि त्यात भाजपा पदाधिकाऱ्याकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या वैशाली नागवडे यांच्यावर हात उचलल्याच्या प्रकरणावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या गोंधळावरून सध्या राज्यातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. याप्रकरणी भाजपाच्या संबंधित कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“कानफाटात मारावीशी वाटली होती” या वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करणारे मर्दांचे महा विकास आघाडी सरकार आता “हात तोडण्याची” भाषा करणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळेंवर तशीच कारवाई करणार ना?
अहो बेस्ट मुख्यमंत्री… जनतेला दिसू तर द्या तुमची मर्दानगी. pic.twitter.com/2rMtydtkIN— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 18, 2022
याप्रकरणी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही पक्षातील महिलेवर हात उगारला, तर स्वतः तिथे जाऊन हात तोडून हातात देईन’, असा इशारा दिला हता. यावरूनच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी थेट महाविकास आघाडी सरकारला रोखठोक सवाल विचारला आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ” कानफाटात मारावीशी वाटली होती” या वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करणारे मर्दांचे महा विकास आघाडी सरकार आता “हात तोडण्याची” भाषा करणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळेंवर तशीच कारवाई करणार ना? अहो बेस्ट मुख्यमंत्री… जनतेला दिसू तर द्या तुमची मर्दानगी..’ असं म्हणत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे.