मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात दीड वर्षापूर्वी लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. येत्या अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे. यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहे. भाजपकडून यावर प्रतिक्रिया आल्या असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तुलना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासोबत केली आहे.
पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला. शिवेसनानेते संजय राऊत म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातले शेतकरी आंदोलन करत होते.
सरकारची भूमिका सुरुवातीपासूनच आडमुठेपणाची होती. उशीरा का होईना पंतप्रधानांनी देशाचा आवाज ऐकला आणि पहिल्यांदाच मन की बात देशाच्या भावनेशी जोडली गेली आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो,” असं संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत प्रविण दरेकर म्हणाले की, राज्यातील एसटी कर्मचारी देखील मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कर्मचारी न्याय मागत आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलनाप्रमाणेच एसटी कामगारांचं आंदोलन होऊ नये, असं वाटत असेल तर त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढा, अशी मागणी दरकरेंनी केली.