नवी दिल्ली – देशातील 40 हून अधिक शेतकरी संघटनांची एक छत्री संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने रविवारी लष्कर भरतीच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशव्यापी निदर्शनांचे आयोजन केले आहे. माजी सैनिक युनायटेड फ्रंट आणि विविध युवा संघटनांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी शनिवारी सांगितले की, मोहिमेतील पहिले पाऊल म्हणजे 7 ते 14 ऑगस्टदरम्यान “जय जवान जय किसान” परिषद आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश जनतेला वादग्रस्त अग्निपथ योजनेच्या घातक परिणामांबद्दल शिक्षित करणे आणि लोकशाही, शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्ग वापरून केंद्राला ते मागे घेण्यास भाग पाडणे आहे असा आहे, असे योगेंद्र यादव यांनी सांगितले.
ते म्हणाले की, जर तीन शेतीविषयक कायदे भयंकर असतील तर अग्निपथ योजना विनाशकारी आहे. आमचे शेतकरी आणि सैनिक संकटात असताना, आमच्या देशाचा कणा तुटण्याचा धोका आहे. आम्ही शांत आहोत असे पाहून हे सरकारला देशाची संरक्षण व्यवस्थाच मोडकळीला आणू पहात आहे. हे आम्हाला सहन करता येणार नाही, असे यादव यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
“फुकटचे रेवडी वाटप”वरून भाजप खासदाराचाच मोदी सरकारवर हल्ला
हरियाणातील जिंद जिल्हा, मथुरा (उत्तर प्रदेश) आणि कोलकाता येथे रविवारी या मोहिमेअंतर्गत काही प्रमुख कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 9 ऑगस्ट रोजी रेवाडी (हरियाणा) आणि मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) येथे कार्यक्रम होणार आहेत. ऑगस्टला इंदूर (मध्य प्रदेश) आणि मेरठ (उत्तर प्रदेश) आणि पाटणा येथे कार्यक्रम होणार आहेत. यादव म्हणाले की, अग्निपथ योजना मागे घेण्यात यावी आणि पूर्वीची नियमित आणि कायमस्वरूपी लष्कर भरतीची पद्धत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे.
हिंगोली: शिक्षकाची विष पिऊन शाळेच्या मैदानावर आत्महत्या; सरपंच, मुख्यध्यापकांसह 12 जणांवर गुन्हा