नवी दिल्ली – भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था राबवण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना केली आहे.
करोनाच्या पार्स्वभूमीवर आंदोलन करत असताना ओग्य आणि शामाजिक अंतराचे निकष काटेकोरपणे पाळण्याची काळजी घेण्याचे आदेश त्यांनी दिले. द्रशात कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काळजी घ्यावी, असे या सूचनापत्रात नमूद केले आहे.
अखील भारतीय व्यापारी संघटनांच्या शिखर परिषदेने या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी नेत्यांनी आमची भेट घेतली नसल्याचे सांगत बंदला पाठींबा देण्याची विनंती केली नसल्याचे सांगितले. त्यामुळे या बंदमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले.