नवी दिल्ली – पुलवामा हल्ल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच काँग्रेस नेता उदित राज यांनी वादग्रस्त विधान केले आहे. २०२४मध्येही पुलवामा सारखा हल्ला पुन्हा होण्याची शक्यता उदित राज यांनी वर्तवली आहे.
उदित राज म्हणाले कि, उपेक्षित समाजांना सत्ताधारांच्या देशभक्तीची किंमत मोजावी लागते. २०२४मध्ये पुन्हा पुलवामासारखा हल्ला होऊ शकतो. यामुळे राहुल गांधी यांनी विचारलेले प्रश्न योग्य असून पुलवामा हल्ल्याचा तपास झालाच पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच जे लोक गुजरातमध्ये सत्तेसाठी नरसंहार करू शकतात. ते सत्ता टिकवण्यासाठी ४० जवानांच्या प्राणांचा बळीही देऊ शकतात. यांच्यासाठी देशभक्ती आणि राष्ट्रवाद केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे साधन आहे, असा आरोपही उदित राज यांनी केला आहे.
जो लोग सत्ता पाने के लिये गुजरात में नरसंहार करवा सकते हैं, वो सत्ता बनाये रखने के लिये 40 जवानों की जान का सौदा भी कर सकते हैं।
इनके लिये देशभक्ति और राष्ट्रवाद जनता को भरमाने का एक टूल भर है।
— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) February 15, 2020
दरम्यान, पुलवामा हल्ल्याच्या घटनेला एक वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली वाहतानाच मोदी सरकारला तीन प्रश्न विचारून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्याचा सर्वाधिक लाभ कोणाला झाला? या हल्ल्याची चौकशी अजून का पुढे सरकू शकली नाही? आणि भाजप सरकार मधील कोणीच या हल्ल्यात झालेल्या सुरक्षेच्या गफलतीबद्दल जबाबदारी का स्वीकारली नाही असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.