मुंबई – सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर बुधवारी रात्री लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला. जनतेचे, मित्रपक्षांचे आणि शिवसैनिकांचे आभार मानत त्यांनी सत्तेला “जय महाराष्ट्र’ केला. ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्ता गमावली आहे. आता राज्यात सत्ताबदल होणार आहे. त्यातून सरकार स्थापण्याचा भाजपचा मार्ग मोकळा होणार आहे. आता शिवसेनेतील बंडखोर गटासह नव्या सरकारची रचना कशी असणार याविषयी उत्सुकता असेल.
यातच आता सोशल मीडियावर अनेक राजकीय मिम्स ट्रेंड करत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा राजीनामावरून सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेवरून मनसेने टोला तर लागावलेला नाही ना अशी चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे यांचे ट्विट
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022