नवी दिल्ली: भारताचे महान धावपटू म्हणून मिल्खा सिंग यांना ओळखले जाते. शुक्रवारी रात्री वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते करोनासोबत लढा देत होते. मिल्खा सिंग यांच्या वेगाने संपूर्ण जगाचे त्यांच्याकडे लक्ष वेधले होते. एका दशकाहून अधिक काळ त्यांनी ट्रेक अॅण्ड फिल्डमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. त्यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929 मध्ये गोविंदपुरामधील एका शीख कुटुंबात झाला. फाळणीनंतर ते भारतात आले होते.
मिल्खा सिंग यांना लहानपणीपासूनच खेळात रस होता. भारतात आल्यानंतर ते सैन्यात सामील झाले होते, इथूनच त्यांच्या करिअरला एक वेगळं वळण मिळाले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सैन्याने मिल्खा सिंग यांना तीन वेळा नाकारले होते. चौथ्यांदा त्यांची निवड झाली आणि सैन्यात असताना त्यांनी आपल्या कौशल्यांना आणखी परिष्कृत केले.
क्रॉस-कन्ट्री रेसमध्ये मिल्खा सिंग 400 हून अधिक सैनिकांसह धावले होते. ज्यात ते सहाव्या स्थानी आले. हा तोच काळ होता ज्यानं त्यांचे नशीब बदलले आणि त्यांच्या मजबूत कारकिर्दीचा पाया घातला गेला. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही आणि आपली छाप सतत सोडली.
मिल्खा सिंग यांनी राष्ट्रीय खेळांशिवाय कॉमनवेल्श गेम्समध्ये एक आणि आशियाई स्पर्धेत 4 गोल्ड मेडल पटकावले आहेत. मात्र, मिल्खा सिंग यांचे ‘फ्लाईंग सिख’ नाव का पडले हे तुम्हाला माहिती आहे का? हे नाव त्यांना एका पाकिस्तानी धावपटूला हरवल्यामुळे पडले आहे. मिल्खा सिंग यांनी पाकिस्तानच्या चोटीमधील धावपटू अब्दुल खालिक यांनी हरवले होते. यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान फील्ड मार्शल आयूब खान यांनी त्यांना ‘द फ्लाईंग सिख’ नाव दिले होते. मिल्खा यांना हे पदक देत आयूब खान म्हणाले, की आज मिल्खा धावत नव्हते तर लढत होते, त्यामुळे आम्ही त्यांनी फ्लाईंग ‘सिख’चा किताब देत आहोत.