नवी दिल्ली – टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना डच्चू दिला जाणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
तसेही शास्त्रींची मुदत या स्पर्धेपर्यंतच होती. मात्र, त्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
टी-20 विश्वंकरंडकानंतर केवळ शास्त्री यांचीच नव्हे तर सपोर्ट स्टाफमधील सदस्यांचेही करार संपणार असल्याने नव्या व्यक्तींची नियुक्ती होणार आहे.
येत्या 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार असून शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचीही मुदत संपत असून बीसीसीआयने यासाठी अर्ज करण्याचेही आवाहन इच्छुक व्यक्तींना केले आहे.