लॉकडाऊनच्या काळात वांद्रे येथे फिरणाऱ्या टायगर श्रॉफला मुंबई पोलिसांनी अडवले होते. त्यानंतर लॉकडाऊनचे नियम तोडल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी टायगर श्रॉफ विरोधात तक्रार दाखल केली.
टायगर श्रॉफवर तक्रार दाखल झाल्याची बातमी वेगात व्हायरल झाली आणि आता टायगरची आई आयशा श्रॉफ भडकल्या असल्याची बातमीही तितकीच वेगाने पसरली आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भैयानीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने टायगर आणि दिशाला पोलिसांनी अडवल्याची माहिती दिली होती. शिवाय हे योग्य आहे की अयोग्य असे विचारले होते.
या पोस्टवर टायगर श्रॉफच्या आई आयशा श्रॉफ यांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली. तुमची तथ्ये चुकीची आहेत. ते घरी जात होते आणि पोलिसांनी त्यांना थांबवून आधार कार्ड चेक केले. अशा काळात फिरण्याची कुणाला हौस नाही.
कृपया अशा गोष्टी बोलण्यापूर्वी त्यातील तथ्य जाणून घ्या. दरम्यान, आयशा यांच्या कमेंटवर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यातल्या काही तर असभ्य आहे. हे दोघे कुठे गेले होते, कशाला गेले होते अशा फालतू कमेंटसचा भरणा आहे.
मुळात लोकांनी हेही समजून घेतले पाहिजे की सेलिब्रिटी असले तरी त्यांनाही स्वत:चे खासगी आयुष्य असते व ते त्यांना जगू द्यावे. त्यांनी काय सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना विचारून करणे अपेक्षित आहे का? टायगर आणि दिशा यांची मैत्री आहे. ती आजची नाही.
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने त्याच बातम्या मसाला लावून विकल्या जातात. पण त्यांचे पर्सनल असे काम असूच नये का किंवा त्यांनी ते करूच नये का? बरे प्रतिक्रिया देणारे किती जण करोनाचे प्रोटोकॉल पाळत असतील हाही संशोधनाचाच विषय आहे.