मुंबई – एका फिल्म फेस्टिवल दरम्यान ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट एक प्रोपोगंडा असल्याची टीका होत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता या चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे. एका पार्टीचा प्रचार करण्यासाठी आणि एका पार्टीच्या विरोधात हा चित्रपट बनवण्यात आला होता. जिथे जिथे भाजप सरकार आहे तिथे या चित्रपटाचा प्रचार झाला परंतु हा सिनेमा आल्यानंतर काश्मीरमध्ये सर्वाधिक किलिंग झाल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, या सिनेमाला फिल्म फेस्टिवलमध्ये प्रोपोगंडा यासाठी म्हंटले आहे कारण चित्रपटात एकाच पक्षाचा स्पष्ट प्रचार दिसत आहे. तो चित्रपट आल्यानंतर एका पक्षाने चित्रपटाचा गाजावाजा केला. परंतु त्यानंतरच काश्मीरमध्ये जास्त पंडितांचे किलीग्ज झाले आपल्याला माहिती असेल गेल्या वर्षभरामध्ये काश्मिरी पंडितांवरील हल्ले जास्त वाढले आहेत. ” असं स्पष्ट मत राऊत यांनी यावेळी मांडले. त्यामुळे काश्मीर फाईल्स २ काढावा अशी जेव्हा आम्ही मागणी करतो त्यावर ते निर्माते काही बोलत नसल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.
या सिनेमावर निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये कमावले परंतु यातील काही रक्कम काश्मिरी पंडितांच्या अनाथ मुलांना दयावे अशी मागणी केली असता निर्माते यावर काहीच बोलत नसल्याचे देखील राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. काश्मीर फाईल्स चित्रपटामुळे आता पुन्हा एकदा भाजप आणि विरोधक आमनेसामने येत असल्याचे पाहायला मिळत आहे.