नवी दिल्ली – पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी करोना मार्गदर्शक तत्त्वांदरम्यान निवडणुकांसंदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि अनेक मोठ्या घोषणा केल्या. या निवडणुका 7 टप्प्यात होणार आहेत. तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. जाणून घेऊया नेत्यांच्या प्रतिक्रिया..
सीएम योगींनी केला विजयाचा दावा –
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून निवडणुकीच्या तारखेचे स्वागत केले आहे. तसेच डबल इंजिन सरकार हे प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल, असे म्हटले आहे.
लोकतंत्र के महापर्व में प्रदेश के चुनाव की तिथियों की घोषणा का स्वागत।
भारतीय जनता पार्टी डबल इंजन की सरकार की उपलब्धियों के आधार पर जनता जनार्दन के आशीर्वाद से प्रचंड बहुमत की सरकार बनाने में सफल होगी।
— Yogi Adityanath (मोदी का परिवार) (@myogiadityanath) January 8, 2022
अखिलेश यांनी आक्षेप घेतला –
सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, 10 मार्चला भाजपचा सुफडासाफ होईल, संपूर्ण राज्य या दिवसाची वाट पाहत आहे. यासोबतच अखिलेश यांनी 15 जानेवारीपर्यंत एकही रॅली होणार नाही या निवडणुक आयोगाच्या आदेशावर आक्षेप घेतला. या मुद्द्यावर अखिलेश म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करतो, मात्र निवडणूक आयोगाने डिजिटल जागेसाठी नियम बनवावेत, कारण सत्ताधारी पक्ष त्याचा गैरवापर करू शकतात.
1.यूपी सहित पाँच राज्यों में विधानसभा आमचुनाव हेतु भारत निर्वाचन आयोग द्वारा आज तिथि की घोषणा का स्वागत। आशा ही नहीं बल्कि पूर्ण विश्वास है कि आयोग यह चुनाव स्वतंत्र, निष्पक्ष, सुचारू व शान्तिपूर्वक कराने की अपनी ज़िम्मेदारी को जन अकांक्षा के अनुरूप पूरी मुस्तैदी से जरूर निभाएगा।
— Mayawati (@Mayawati) January 8, 2022
मायावती यांनी केले विशेष आवाहन –
बसपा सुप्रीमो मायावती यांनीही ट्विटरवर एक पोस्ट लिहून या घोषणेचे स्वागत केले आहे. निवडणूक आयोग निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल अशी आशा व्यक्त केली आहे. याशिवाय प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी नवनवीन डावपेच अवलंबून आदर्श आचारसंहितेचा भंग करतात, याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
काँग्रेस नेते हरीश रावत म्हणाले, ‘उत्तराखंडच्या निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. काँग्रेस नेहमीच आचारसंहिता आणि निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते.
दरम्यान, निवडणूक आयोगाने आज देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 10 फेब्रुवारी पासून सात टप्प्यांमध्ये ही मतदान प्रकिया पार पडणार आहे. गोवा, उत्तराखंड आणि पंजाबात 14 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून उत्तरप्रदेशात मात्र 10 फेब्रुवारीपासून सात टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे.मणिपुर मध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च या दोन टप्प्यात मतदान होणार आहे. या पाचही राज्यांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे 10 मार्चला होणार आहे.