नवी दिल्ली – श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. २६ वर्षीय श्रद्धाचा निर्घृण पद्धतीने हत्या करणाऱ्या आफताब विरोधात सर्वांकडूनच रोष व्यक्त केला जात आहे. नुकतंच आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं आहे. दरम्यान, यावेळी त्याचवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न देखील झाला होता.
मात्र, या हत्याप्रकरणाच्या तपासात दररोज नवनवीन चक्रावून टाकणारी माहिती समोर येत असून, यामुळे सर्वांच्याच भुवया उंचगावल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, सध्या आफताबची कसून चौकशी करण्यात येत आहे. नुकतीच त्याची पॉलीग्राफ चाचणी देखील करण्यात आली असून, श्रद्धाची हत्या केल्यानंतर एका मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या तरुणीला डेट केल्याची माहिती आफताबाने पोलिसांना दिली होती.
यावेळी आफताब ने सांगितले.., “तो आणि संबंधित तरुणी जून-जुलै महिन्यात बम्बल या डेटिंग अॅपवर भेटले होते. त्यानंतर ही तरुणी छत्तरपूर येथील फ्लॅटवर आफताबला भेटायला आली होती. त्यावेळी आफताबने श्रद्धाची हत्या करुन काही दिवस उलटले होते. तरीही आफताब या तरुणीला बिनधास्त फ्लॅटवर भेटत असल्याचं त्याने सांगितलं आहे.’ त्याच्या या वक्तव्याने पोलीस अधिकाऱ्याना देखील धक्का बसला आहे. या सगळ्या गोष्टीतून आफताबची क्रूर मानसिकता समोर आल्याचं दिसून येते.
त्यानंतर पोलिसांनी संबंधित मानसोपचार तज्ज्ञ तरुणीची चौकशी केली. यावेळी तिला आफताब पुनावाला आणि त्यांच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तरुणीने सांगितले की, टेलिव्हिजनवर आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला. आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती. असं या तरुणीने सांगितलं आहे.
मी आनंदानं फाशी जाईल स्वर्गात मिळेल मला अप्सरा…
दरम्यान, पॉलिग्राफ चाचणीनंतर आफताबने केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. चौकशी दरम्यान आफताबने “मी आनंदानं फाशी जाईल स्वर्गात मिळेल मला अप्सरा…’ असं धक्कादायक विधान केलं होत. तर इतकेच नव्हे तर त्याने २० पेक्षा अधिक हिंदू मुलींसोबत संबंध ठेवले होते.
काय आहे नेमकं प्रकरण…!
श्रद्धा आणि आफताब हे दोघेही काही महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. एका डेटिंग अँपवरून दोघांची ओळख झाली होती. श्रद्धा घरच्यांच्या विरोधात जाऊन आफताबसोबत राहत होती. श्रद्धाने लग्नाचा आग्रह केल्याने आफताबने तिचे ३५ तुकडे करून निघृण पद्धतीने हत्या केली. तब्बल सहा महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती.