नवी दिल्ली : कोरोना विषाणूग्रस्त इटलीतील 211 विद्यार्थ्यांसह एकूण 218 भारतीयांना मायदेशात आणले आहे. यापूर्वी रविवारी सकाळी इराणमध्ये फसलेल्या 234 जणांना भारतात आणण्यात आले होते. या सर्व प्रवाशांना एअर इंडियाच्या दोन विमानातून भारतात आणले.
मुरलीधरन यांनी व्टिमध्ये म्हटले की, मिलानहून विद्यार्थ्यांसह 14 भारतीय दिल्लीत पोहोचले. सर्वांना 14 दिवसांसाठी वेगळे ठेवण्यात येणार आहे. भारतीय नागरिक जेथेही असतील, भारत सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिबद्ध आहे.
The 218 Indians who landed from Milan, Italy at Delhi airport will be shifted to Indo-Tibetan Border Police’s Chhawla camp. #coronavirus pic.twitter.com/ER6ylfLUCE
— ANI (@ANI) March 15, 2020
इराणहून बाहेर काढण्यात आलेला भारताचा हा तिसरा जत्था आहे. भारतीय भाविकांचा दुसरा जत्था शुक्रवारी इराणहून भारतात आला होता. इराणमधून 58 भारतीय भाविकांचा पहिला जत्था मंगळवारी आला होता.
कोरोना विषाणूमुळे इटली, तुर्की, न्यूझीलंडसह जगातील तमाम देशांनी खबरदारीसाठी सक्तीची पावले उचलली आहेत. आता या विषाणूचा प्रकोप आधीच संकटात सापडलेल्या व्हेनेजुएलापर्यंत पोहोचला आहे. जगभरात बाधितांची संख्या शनिवारी दीड लाखाहून अधिक झाली आहे. पाकिस्तानमध्येही आणखी दोन प्रकरणांना पुष्टी मिळाली आहे.