नवी दिल्ली : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने ऐतिसहासिक विजयाची नोंद केली. दरम्यान, भारताने मिळवलेल्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला असून, भारतीय संघाचे कौतूक करत अभिनंदन केले आहे.
We are all overjoyed at the success of the Indian Cricket Team in Australia. Their remarkable energy and passion was visible throughout. So was their stellar intent, remarkable grit and determination. Congratulations to the team! Best wishes for your future endeavours.
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2021
मालिका विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. “पंतप्रधान मोदी म्हणाले,”पंतप्रधान मोदी म्हणाले, ”भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या विजयामुळे आपण खूप खूश आहोत. भारतीय संघाची ऊर्जा आणि विजयाचं वेड दिसून येत होतं. त्याचबरोबर त्यांचा दृढ निर्धार, उल्लेखनीय धाडस आणि दृढ संकल्प होता. संघाचे अभिनंदन. भविष्याती प्रयत्नांसाठी भारतीय संघाला शुभेच्छा,” असे म्हणत मोदींनी विजयानंतर आनंद व्यक्त केला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघानं शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचे कठीण आव्हान पार केले आहे.