मुंबई -मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निकालावर प्रतिक्रिया देत शिवसेना भाजप युतीच्या पुढील वाटचालीबाबत भाष्य केले आहे.
केंद्रीय निववडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देत त्यांना शिवसेना आणि पक्ष चिन्ह दिले यासाठी मी शिंदेंचे अभिनंदन करतो असं बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले. लोकशाहीमध्ये जनप्रतिनिधी कोणाकडे जास्त आणि जास्तीत जास्त मतदार कोणाकडे आहे हे स्पष्ट झाले या बाबींवर निकाल आला, हा सत्यमेव जयते असा निकाल आहे असे स्पष्ट मत यावेळी बावनकुळेंनी व्यक्त केले.
पुढच्या काळात जे महाराष्ट्राला अभिप्रेत आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये जी अभेद्य युती होती ही युती पुन्हा महाराष्ट्रात कायम राहील. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप युतीला चांगले बळ मिळेल आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ४५ प्लस खासदार आणि २०० प्लस आमदार भाजप शिवसेना युतीचे निवडून येतील असा विश्वास यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाचे निष्कर्ष
21 जूनला 55 पैकी 24 आमदार
उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते.
त्याच दिवशी अजय चौधरी यांची
गटनेतेपदी निवड केली गेली.
परंतु 21 जूनलाच एकनाथ शिंदे
यांच्यासोबत 34 आमदार होते.
त्यांनी गटनेता म्हणून
एकनाथ शिंदे यांना निवडले.
त्यामुळे अजय चौधरींची
झालेली निवड बेकायदेशीर.
2018 मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेला बदल आयोगाला कळविण्यात आला नाही.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी
बनविलेल्या 1999 च्या पक्षांतर्गत
लोकशाहीचे निकष बदलण्यात आले.
1999 मधील बदल बाळासाहेब ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते.
शिवसेना पक्षाने 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत.
पक्षांतर्गत निवडणुका न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
त्यामुळे ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला.
निवडणूक आयोगाच्या आक्षेपानंतर पक्ष घटना अधिक सुसंगत करण्यात आली.
शिवसेना पक्ष एका कुटुंबाची मालमत्ता झाली.
सादिक अली (तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष) प्रकरणाचा हवाला.
कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर
इंदिरा कॉंग्रेसला बहुमताच्या आधारे मान्यता.
बहुमताची चाचणी आणि
संघटनेतील बहुमत याचाही विचार.
निवडणुकीत कोणत्या गटाला
किती मते मिळाली या मुद्द्यांवर भर
2019 च्या निवडणुकीत शिवसेनेला
मिळालेल्या 90 लाख 49 हजार 789
मतांपैकी शिंदे गटाच्या आमदारांना
40 टक्के तर ठाकरे गटाला 12 टक्के मतं.