मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान पार पडले असून, 2 फेब्रुवारीला या निवडणुकांचा निकाल जायीर करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या तिन्ही बलाढ्य पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवली. तीन मोठे पक्ष समोर असल्याने पराभव होणार माहीत असूनही सत्यजित तांबे यांनी मैदानात झुंज दिली अन् मोठ्या फरकाने विजय मिळवला.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीत शुभांगी पाटील यांनी चांगलं आव्हान निर्माण केलं होतं. पण त्यांचा पराभव झाला. यावेळी सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झाला आहे. दरम्यान, विजय नंतर सत्यजित तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यावेळी ते म्हणाले, “जनतेचे आभार व्यक्त करतो. या निवडणुकीत अनेक संघटना आणि संस्थांनी मला मदत केली. डॉ सुधीर तांबे यांनी तीन टर्म चांगली सेवा केली आहे. आता अशीच सेवा माझ्याकडून होईल. मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने मताधिक्य कमी झाले. मतदान यादीतील घोळ आणि सोमवारचा दिवस असल्याने मतं अपेक्षेपेक्षा कमी पडली. लवकरच मी राजकीय भूमिक स्पष्ट करेन”. असं ते म्हणाले आहेत.