नवी दिल्ली – करोनाचा धोका संपुष्टात आला तरीही जागतिक क्रिकेटची गाडी रुळावर यायला बराच वेळ लागेल. तसेच लगेचच पुन्हा क्रिकेटचे सामने तसेच मालिका सुरू करताना काळजी घ्यावीच लागेल, असे मत भारताचा अव्वल ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विन याने व्यक्त केले आहे.
करोनामुळे जागतिक तसेच स्थानिक क्रिकेट सध्या बंद आहे. हा धोका नाहिसा झाला तरीही लगेच पहिल्याप्रमाणे मालिका होणार नाहीत. तसे करताही येणार नाही, कारण हा धोका संपला तरीही पुढील बराच काळ काळजी घ्यावी लागेल. आज करोनाचा नायनाट झाला व उद्यापासून सामने सुरु होतील अशी अपेक्षा करणे चूक ठरेल. करोनाच्या धोक्यातून कधी बाहेर येऊ हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने संयम ठेवणे आवश्यक आहे, असे अश्विनने स्पष्ट केले.