बॉलीवूडमधील सेलिब्रेटींच्या अनेक प्रेमकथा त्यांच्या शेवटापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत मात्र त्यांचे नाते खूप प्रसिद्ध झाले आहेत. अशीच एक जोडी आहे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता रणवीर सिंग यांची. अनुष्का-रणवीर यांच्या नात्याची जोरदार चर्चा होती. पण या दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही.
दोघांनी पहिल्यांदा ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. रणवीर सिंगचा हा पहिलाच डेब्यू चित्रपट होता तर अनुष्काचा हा दुसरा चित्रपट होता. चित्रपटातील दोघांच्या कामाचे खूप कौतुक झाले आणि चित्रपट हिटही झाला होता. एकत्र काम करत असताना, त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री तसेच त्यांची ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री खूप चांगली झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघं एकमेकांना डेट करायला लागले. ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातही दोघांची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळाली. काही काळ दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चालले होते, पण नंतर 2011 मध्ये एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान दोघांच्या नात्यात बिघाड झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीरने सोनाक्षी सिन्हासोबत एक अभिनय केला, ज्यामुळे अनुष्का त्याच्यावर चिडली. दोघांनी सर्वांसमोर भांडणही केल्यानंतर संपूर्ण कार्यक्रमात के एकमेकांशी बोलले नाही. रिपोर्ट्सनुसार, दोघांचे नातेही मत्सरामुळे बिघडले. एकीकडे अनुष्काला त्यावेळी मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळत होते तर दुसरीकडे रणवीर इंडस्ट्रीत स्थान निर्माण करत होता. या सर्व गोष्टींमुळे अखेर त्यांचे नाते तुटले.
एका मुलाखतीत रणवीर अनुष्कासोबतच्या ब्रेकअपवर म्हणाला होता की, मला तिची खूप आठवण येते. ती प्रेमाने भरलेली आहे आणि लोकं तिला चुकीचे समजतात. ती एक अतिशय गोड आणि प्रामाणिक व्यक्ती आहे जिला मी भेटलो आहे. जेव्हा मी तिच्या विरोधात नकारात्मक लेख वाचतो तेव्हा मला राग येतो, परंतु माझ्यावर लिहिलेल्या नकारात्मक लेखांचा मला इतका राग येत नाही.