मुंबई – पेट्रोल, डिझेल दरवाढीचे सत्र कायम आजही कायम आहे. मात्र, इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर अधिक महाग झाले आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि माल वाहतुकीला जबर आर्थिक फटका बसणार आहे.
याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल अभिनेता अक्षय कुमार याला काही सवाल करत टोला लगावला होता. मात्र, आज आव्हाड यांनी महायानक अमिताभ बच्चन यांना देखील चिमटा काढला आहे.
T 753 -Petrol up Rs 7.5 : Pump attendent – ‘Kitne ka daloon ?’ ! Mumbaikar – ‘2-4 rupye ka car ke upar spray kar de bhai, jalana hai !!’
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 24, 2012
बिग बींनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून इंधन दरवाढीवर पोस्ट शेअर केली. त्यात बिग बी म्हणाले, पंपवरील कर्मचारी विचारतो- कितीचे पेट्रोल टाकू? त्यावर मुंबईकर म्हणतो- 2-4 रुपयांचे कारवर शिंपड, जाळून टाकतो, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.
Have u not refilled Ur fuel on petrol pump or u dnt look at the bill @SrBachchan
It’s time for u to speak hope u r not biased
The price of diesel petrol has reached peak ab Mumbaikar kya kare car jalaye ya car chalaye https://t.co/ECYwNmmqYq— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 26, 2020
दरम्यान, आता त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधत ‘मुंबईकरांनी गाड्या जाळायच्या की चालवायच्या?’ असा सवाल विचारला आहे.
आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात, तुम्ही पेट्रोल पंपवर जाऊन पेट्रोल भरले की नाही? का तुम्ही बिल पाहिले नाही? ही बोलण्याची वेळ आहे. तुम्ही तरी पक्षपातीपणा करणार नाही, अशी आशा आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. आता मुंबईकरांनी गाड्या जाळायच्या की चालवायच्या. असं आव्हाड म्हणाले.