नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे झाले आहेत. त्यातच आता हाच मुद्दा घेवून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कोंडी करण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला परंतू, त्यात पाकला यश आले नाही. दरम्यान, या सर्व तणावाच्या वातावरणात आता भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
All India Tennis Association: India vs Pakistan Davis Cup tie will take place at Islamabad either on 29th & 30th November or 30th & 1st December.However,security situation will be reviewed on November 4 whether the tie can be held in Islamabad or to be shifted to a neutral venue. pic.twitter.com/kmy9CVR4ft
— ANI (@ANI) September 13, 2019
भारतीय टेनिस संघ तब्बल 55 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 29 आणि 30 नोव्हेंबरला संघाचा दौरा असणार आहे. किंवा 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर दरम्यान, संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या डेव्हिस कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाणार आहे. दरम्यान, या अगोदर 4 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेवूनच भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्यावर पाठवणार असल्याचे भारतीय टेनिस संघाने म्हटले आहे. तसेच सुरक्षा व्यवस्था समाधानकारक नसेल तर या सामन्याचे आयोजन अन्य ठिकाणी करण्यात येणार असल्याचेही म्हटले जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टेनिसचा सामना 1964 साली लाहोरमध्ये झाला होता. त्यावेळी भारताने पाकिस्तानला 4-0 ने पराभूत केले होते. त्यानंतर 2006 मध्ये मुंबईत हा सामना झाला होता त्यावेळीदेखील भारताने पाकिस्तानला 3-2 अशा फरकाने पराभूत केले होते. त्यामुळे आता 13 वर्षानंतर पुन्हा दोन्ही संघात हा सामना रंगणार आहे.