नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनातील टुलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी या तरुणीला अटक केली आहे. दिशाच्या अटकेनंतर आता या प्रकरणात वेगळे राजकारण होत असल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर निशाणा केला आहे.
आता काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिशा रवीच्या अटकेनंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. “एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरत आहेत” अशी घणाघाती टीका प्रियंका यांनी केली आहे.
डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से
फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से#ReleaseDishaRavi #DishaRavi#IndiaBeingSilenced— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 15, 2021
“डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से, फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से” अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी दिशा रवीच्या अटकेचा निषेध केला आहे. अटकेवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच ReleaseDishaRavi, DishaRavi IndiaBeingSilenced हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम आणि शशी थरूर यांनी देखील आता दिशाच्या अटकेचा विरोध केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे.