मुंबई – आर्थिक स्थिती पूर्वपदावर येत असल्याची लक्षणे वाढली आहेत. तिसऱ्या तिमाहीत आगाऊ कर भरणा (ऍडव्हान्स टॅक्स) 49 टक्क्यांनी वाढून 1.09 लाख कोटी रुपयांवर गेला आहे.
प्रत्यक्ष मंडळाच्या सूत्रांनी सांगितले की, गेल्या वर्षी या काळात केंद्र सरकारने कंपनी कर कमी करून 25 टक्क्यांपर्यंत आणला होता.
त्यामुळे गेल्या वर्षी कर संकलन कमी झाल्यामुळे यावर्षी झालेले कर संकलन तुलनेने जास्त भासत आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत 73 हजार 126 लाख कोटी रुपयांचा आगाऊ कर भरणा झाला होता.
या तिमाहीत 7.33 लाख कोटी रुपयाचे ढोबळ करसंकलन झाले आहे. तर 5.87 लाख कोटीचे निव्वळ कर संकलन झाले आहे. या तिमाहीत कर विभागाने 1.46 लाख कोटी रुपयाचा परतावा दिला. तिसऱ्या तिमाहीतील कर संकलन वाढले असले तरी पहिल्या दोन तिमाहीतील करसंकलन कमी झाले आहे. त्यामुळे वार्षिक कर संकलनाच्या आकडेवारीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांना वाटते.