पुणे – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी सुलभ व सोपी ऑनलाइन पद्धत राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सर्व प्रक्रिया घरी बसूनच पूर्ण करता येणार आहे. संगणक, लॅपटॉप याबरोबरच मोबाइल ऍपद्वारेही विद्यार्थ्यांना आवश्यक ती माहिती उपलब्ध होणार आहे. प्रवेशाबाबतच्या तक्रार निवारणासाठीही कॉल सेंटर, तक्रार निवारण केंद्र, शाळा व मार्गदर्शन केंद्र यांची यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती या क्षेत्रांमध्ये इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. युट्युब लाईव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला. शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील, सहायक संचालक प्रिया शिंदे, राकेश नागपुरे, अशोक पानसरे आदींनी कार्यक्रमात सहभाग घेतला. यंदा करोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल उशिरा लागला आहे. मात्र हा निकाल चांगला लागला असून यात मुलींनी उत्तम यश मिळविले ही कौतुकास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या कष्टानुसार त्यांना यश मिळाले आहे. त्यानंतर आता पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाटचाल सुरू झालेली आहे.
पोर्टलवर “कट ऑफ’ ची माहिती मिळणार
विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना कनिष्ठ महाविद्यालयांच्या विविध आरक्षणनिहाय “कट ऑफ’ ची माहितीही पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविताना अडचणी येणार नाहीत. महाविद्यालयातील प्रवेश क्षमता, सोयी-सुविधा, वसतिगृह यांचीही माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मोबाइल ऍपद्वारेही सर्व माहिती मिळणार
व्हिडीओद्वारेही आवश्यक माहिती मिळणार
माहिती पुस्तिकाही डिजिटल स्वरूपात
प्रवेश शुल्कही ऑनलाइनच भरावे लागणार
कागदपत्रे सादर करण्यासाठी तीन महिने मुदतवाढ
अर्ज भरण्याच्या सरावामुळे चुका टाळणे शक्य
यूट्युब, फेसबुकवरही माहिती मिळणार