मुंबई- युवासेना अध्यक्ष ‘आदित्य ठाकरे’ यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त पत्रकार परिषेद आयोजित केली होती. त्यामध्ये आदित्य ठाकरेंनी विविध मुद्यांवर पत्रकारांशी सवांद साधला. दरम्यान, त्यांनी अकरावी प्रवेशावरून निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे सांगितले आहे.
इंटर्नल गुणांचा (तोंडी परीक्षेचे गुण) खूप मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर होत असतो. यंदा इंटर्नल गुणांच्याअभावी राज्याचा निकाल कमी लागला आहे. त्यामुळे आम्ही, दहावीमधील विद्यार्थ्यांच्या इंटर्नल गुणांबाबत आणि अकरावी प्रवेशाबाबत विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा इंटर्नल मार्क सुरू करण्यात यावे, यासंदर्भात आदेश दिले आहेत. असे,आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले आहे.