जळगाव – आज ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. या अनुषंगाने ठाकरे गट जळगावात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत हे सरकार पंधरा दिवसात गडगडणार असल्याचा इशारा दिला आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. सरकारच डेथ वॉरंट निघालं असून सरकार गडगडणार आहे पुष्पचक्र अर्पण करा असा थेट इशारा राऊत यांनी यावेळी दिला. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले,’महाराष्ट्रासह देशभरात ५० खोके, एकदम ओके हे सर्वांना माहिती झालं आहे. हे घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे त्यावर बोलण्यात फार वेळ वाया घालवायला नको. लोकांची कामं महत्त्वाची आहेत. देशात आणि राज्यात लोकशाही संपायला लागली आहे असं वाटत आहे..’