मुंबई – तेराव्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये आदित्य ठाकरे मोठया मताधिक्याने विजयी झाले आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे ६३ हजार ६७२ मतांनी विजयी झाले आहेत. ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी विजय मिळवत मोठा इतिहास रचला आहे. आदित्य ठाकरे यांना काँग्रेसचे ऍड. सुरेश माने व बिग बोस फेम अभिजित बिचुकले यांचे आव्हान होते. आदित्य ठाकरेंच्या विजयानंतर वरळीमध्ये भावी मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर झळकले आहेत.
शिवसेना युवा नेते भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांचे वरळी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतानी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचे बॅनर्स वरळीत लावण्यात आले आहेत.
Mumbai: Poster calling Aaditya Thackeray as future Chief Minister come up in Worli, the constituency from where he has been elected to the state Assembly.#Maharashtra pic.twitter.com/t2mcqf8Ml5
— ANI (@ANI) October 25, 2019
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये दावे-प्रतिदावे सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या घोषणा शिवसेनेने केल्या होत्या. त्यामुळे शिवसेना भाजपाशी युती कायम ठेवणार की नवी समीकरणे जुळवत राष्ट्रवादी, कॉंग्रेसशी हातमिळवणी करून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणार याबाबत उत्सुकता आहे.