मुंबई – राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेकडून देखील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शनिवारी मध्यरात्री मातोश्रीहून थेट शिवसेना आमदारांशी चर्चा करण्यासाठी मालडच्या रीट्रीट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. या चर्चेनंतर आदित्य ठाकरे यांनी तेथेच मुक्काम ठोकला आहे.
भाजपला निमंत्रण मिळाल्यानंतर शिवसेना आणि कॉंग्रेसच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहे. शिवसेनेच्या आमदारांशी कुणीही संपर्क करु नये, यासाठी सर्व काळजी घेतली जात आहे. शिवसेनेने आमदारांची सर्व जबाबदारी खासदार अनिल देसाई, गजानन किर्तीकर, मिलिंद नार्वेकर, रामदास कदम यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
शिवसेनेच्या सर्व आमदारांची मालाड येथील हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदारांशी चर्चा केली. चर्चेनंतर आदित्य ठाकरे रीट्रीट हॉटेलमध्येच मुक्कामाला आहेत.