मुंबई – इंडियन आयडल शो चा होस्ट असलेला आदित्य नारायणने अलिबागबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मनसेने त्याच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनतर आदित्य नारायणने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माफी मागितली आहे. ”राग पट्टी ठिक से दिया करो, हम क्या अलिबागसे आये है क्या” ? असे अलिबागबद्दल आदित्यने विधान केले होते. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यापुढे अलिबागबद्दल असं काहीही म्हणशील तर तुझ्या कानाखाली आवाज काढेन असा गंभीर इशारा दिला होता.
https://www.facebook.com/AdityaNarayanOfficial/posts/323356702482105
आदित्य नारायण माफी मागताना म्हणाला की, ”मी नम्रपणे हात जोडून अलिबागच्या लोकांची माफी मागतो. माझ्या अलीकडच्या एपिसोडमध्ये मी अलिबागबद्दल जे विधान केले त्यावरून अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा कधीही कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मला अलिबागबद्दल प्रेम आणि आदर आहे. माझ्याही अलिबाग ठिकाणाशी अनेक भावना जोडलेल्या आहेत. तिथले लोक आणि मातीचा मला आदर आहे.”
अमेय खोपकर आदित्यच्या विधानाबाबत म्हणाले होते की, “मी आदित्य नारायणचा एक व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओमध्ये तो एका व्यक्तीवर संतापला अन् म्हणाला मी काय अलिबागवरुन आलोय का? त्याचं हे बोलणं आम्हाला खटकलं आहे. आलिबागची लोकं तुम्हाला इतकी मुर्ख वाटतात का? त्यानं आत्ताच्या आत्ता याबाबत माफी मागावी. मी त्याच्या वडिलांसोबतही बोललो आहे. अन् जर त्यानं माफी मागितली नाही. तर त्याच्या कानाखाली आवाज काढून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं जाईल. यापुढे जर अलिबागबद्दल अशी आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली तर तिथं तुमचं एकही चित्रीकरण करु दिलं जाणार नाही. यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी तुमची गाठ आहे.” असा गंभीर ईशारा मनसेकडून देण्यात आला होता. त्यानंतर आता आदित्यने माफी मागितली आहे.