मुंबई: शिवसेनेचे नेते आणि पहिल्यांदा आमदार झालेले आदित्य ठाकरे यांनी सोमवारी महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. आदित्य ठाकरे म्हणाले, लोकांचे प्रश्न सोडविणे ही आमची प्राथमिकता असेल.
27 वर्षीय आदित्य हे त्यांचे वडील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “मी लोकांसाठी काम करू आणि त्यांच्या समस्या सोडवू इच्छितो.” माझा विश्वास आहे की तीनही पक्ष (शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस) एकत्र काम करतील.
मला आनंद आहे की ज्यांना सत्य आवडते ते आपल्या पाठीशी आहेत. आम्ही सत्याबरोबर आहोत. आम्ही ‘सत्यमेव जयते’ अनुसरण करतो. तिन्ही पक्षांमध्ये विश्वासाची कमतरता नाही.
त्यांचे ‘आदित्य रश्मी उद्धव ठाकरे’ हे पूर्ण नाव घेण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, माझी आई स्वत: ला राजकारणापासून दूर ठेवते. मी विधानसभा निवडणुका लढवाण्यापूर्वी त्यांनी मला विचारले की मी राजकारणात उतरण्यास इच्छुक आहे का?
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा