पुणे – राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थींचे आधार आणि मोबाइल क्रमांक 100 टक्के जोडण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. हे क्रमांक जोडले नसतील, तर पुढील महिन्यापासून स्वस्त धान्य मिळणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेचे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 13 लाख 32 हजार 871 इतके लाभार्थी आहेत. यातील 10 लाख 61 हजार 822 म्हणजे 79.66% टक्के इतक्या लाभार्थींचे आधार जोडले गेलेले आहे.
उर्वरित लाभार्थींचे क्रमांक जोडण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत डेडलाइन आहे. आधार लिंक न केल्यास संबधित लाभार्थींना दि. 1 फेब्रुवारीपासून रेशनवरील धान्य मिळणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.