मुंबई – बॉलिवूड अभिनेता अमिर खान व पत्नी किरण यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडली आहे. आमिर आणि किरण गेल्या पंधरा वर्षापासून सोबत आहेत. घटस्फोटाचा निर्णय दोघांनी परस्पर संमतीने घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र या निर्णयामुळे आमिरच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Actor Aamir Khan and his wife Kiran Rao, in a joint statement announce divorce after 15 years of marriage.
The couple said, "We would like to begin a new chapter in our lives – no longer as husband and wife, but as co-parents and family for each other." pic.twitter.com/gnQd2UPLTZ
— ANI (@ANI) July 3, 2021
आमिर आणि किरण यांनी २८ डिसेंबर २००५ रोजी लगीन गाठ बाधंली होती. त्यानंतर त्यांनी तब्बल १५ वर्षे सोबत संसार केला आहे. मात्र आता या दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटाबाबत दोघांनीही ऑफिशियल निवेदन प्रसिद्ध केले आहे.
Actor #AamirKhan and wife Kiran Rao to divorce after 15 yrs of being together. The couple issues a statement, calls the impending divorce ‘not an end but the start of a new journey’. They have an 10-yr-old son, Azad. pic.twitter.com/kXEyXRXNIP
— Sonal Kalra 🇮🇳 (@sonalkalra) July 3, 2021
या निवेदनात आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू,” असे या निवेदनात म्हटले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
२०११ साली किरणने सरोगसीच्या आधारे मुलाला जन्म दिला. या दोघांना नऊ वर्षांचा आझाद हा मुलगा आहे. त्याआधी आमिरने १९८६ मध्ये अभिनेत्री रिना दत्ताशी लग्न केलं होतं. या दोघांना जुनैद हा मुलगा आणि आयरा ही मुलगी आहे. २००२ साली या दोघांनी घटस्फोट घेतला आणि त्यानंतर दोन्ही मुलांचा ताबा रिना दत्ताला मिळाला होता.