फलटण – परगावांहून साखरवाडी, निंभोरे आणि उपळवे येथे आलेल्या सहा जणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू असल्याने पूर्वपरवानगीशिवाय जिल्हा सोडुन जाता येत नाही.
तरीही फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील जी मंडळी पुणे, मुंबई किंवा परगावी कामासाठी गेलेली आहेत. यातील काही अतिउत्साही मंडळी आपल्या गावाकडे येत आहेत. अशा नागरिकांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.