मुंबई- संजय राऊत यांच्यावरील कारवाईवरून शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्धव ठाकरे यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कालच त्यांनी राज्यपालांवरही जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज राऊतांवर झालेल्या कारवाईमुळे ठाकरे यांचा संयम सुटला आहे.
लाज लज्जा शरम सोडून निर्लज्जपणाने हे कारस्थान सुरु आहे. हिंदुत्वाबाबत बोलायचे जेव्हा कोणाचे धाडस होत नव्हते. तेव्हा शिवसेना हा एकमेव पक्ष हिंदुत्वावर बोलत होता. अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा हे सगळे कोठे होते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला केला.
उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्रावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावरही एकदा भाष्ये केले. जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल, त्याचा आदर करणे शक्यच नाही, असे ते म्हणाले. यांना आता हिंदुत्वाचा पुळका आला आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा धीर पाहिला मात्र कोल्हापूरचे जोडे पाहिले नाही, या भाषेत मी बोललो आणि बोलणारच. जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याचा आदर शक्यच नाही, असेदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, धमक्यांमुळे लोक शिंदे गटात जात आहेत. कोश्यारी यांच्या विधानाचा हा पुढचा टप्पा आहे. त्यांना िंहंदुंमध्ये फूट पाडायची आहे. हिंदू आणि मराठीजनांना वाचवणारा पक्षच राहणार नाही अशी स्थिती निर्माण करण्याची त्यांची रणनीती आहे.